HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले नाहीत”, भाजपची टीका 

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर मंत्री संजय राठोड यांनी मौन सोडलं, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा दावा तब्बल १५ दिवसानंतर माध्यमांच्या समोर येऊन संजय राठोड यांनी केला, परंतु हा दावा करण्यापूर्वी संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर जोरदार शक्तीप्रदर्शन केले, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते, त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार म्हणाले की, कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करू पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरूवर कारवाई नाही, एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले नाहीत, महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात तो मी नव्हेच हे सुरू आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

“राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती असताना एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहेत तर त्यांचेच एक मंत्री हजारोंची गर्दी जमवत आहेत. राठोड यांनी गर्दी जमवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अपमान केलाय”, असं बावनकुळे म्हणाले. तर कोरोना संकटात देखील मंत्री संजय राठोड यांनी काल शक्ती प्रदर्शन केलं, यावर मुख्यमंत्री गप्प का?, असा सवालही त्यांनी विचारला.

पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर गेले १५ दिवस ‘नॉट रिचेबल’ असलेले वनमंत्री संजय राठोड अखेर पोहरादेवी येथे देवदर्शनासाठी गेले होते. तर मंत्री महोदयांच्या दर्शनासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना अक्षरश: लाठीमार करावा लागला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुग्णांच्या सेवेत भर घालण्यासाठी औरंगाबादमध्ये करणार ५० डॉक्टरांची भरती

swarit

दुर्दैवाने महाराष्ट्रात ब्लू फ्लॅगचा अभिमान बाळगावा असा एकही समुद्रकाठी नाही, सत्यजित तांबेंची आदित्य ठाकरेंकडे नाराजी

News Desk

“राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल,” बाळा नांदगावकरांचा इशारा

Aprna