HW News Marathi
महाराष्ट्र

सिंधुदूर्गात विजय मिळणारे राणे म्हणतात नांदेड म्हणजे महाराष्ट्र नव्हे

– राणेंची पून्हा एकदा अशोक चव्हाणांवर टिका

सिंधुदूर्गात आता फक्त भाजप आणि स्वाभिमान पक्ष

मुंबई – सिंधुदूर्गातील सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि शिवसेनेवर टिका केली आहे. नांदेड म्हणजे महाराष्ट्र नाही असा टोला त्यांनी अशोक चव्हाणांना लगावला. एमआयएमला मेनेज करून नांदेडची सत्ता मिळवली असल्याचा आरोप राणे यांनी केला. नांदेड महापालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यांनतर काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमिवर ते बोलत होते. शिवसेनेसह त्यांच्या पालकमंत्र्यांना, खासदार आणि आमदारांना सिंधुदूर्गातील जनतेने नाकारले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. सिंधुदूर्गात आता कोणाचेच आव्हान शिल्लक ठेलेले नाही. या पुढे सिंधुदूर्गमध्ये आपण आणि भाजप हेच वास्तवादी चित्र असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सिंधुदूर्गातील जनतेचे आभार मानत कुठल्याही दिवाळी पेक्षा अभूतपूर्व भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. २०१४ मध्ये जो पराभव झाला तो अपघाताने झाला. आजही सिंधुदूर्गातील जनता माझा बरोबरच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपकडून कोणत्या पदाची अपेक्षा नाही

मंत्रीमंडळात घेण्या बाबत जर मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले असतील तर ते संकेत खरे ठरतात. पण आपली कोणतीही आपेक्षा नाही. महाराष्ट्रातील सर्व पदे आत्तापर्यंत भूषवली आहेत. महत्वकांक्षा तर बऱ्याच आहेत पण आता आपण समाधानी संतूष्ठ असल्याचेही त्यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंधुदुर्गात जमावबंदी असतांना नारायण राणें जन आशीर्वाद यात्रा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार!

News Desk

नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी 1200 कोटींचा निधी द्या,मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे मागणी!

News Desk

कोश्यारीजी इतका अभ्यास बरा नाही; राऊतांचा टोला

Aprna