HW News Marathi
महाराष्ट्र

अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकासआघाडीत नाराजी नाट्य ?

मुंबई | “काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी आम्हाला सांगितले की पहिले हे लिहून घ्या की, संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे या सरकार जाता येणार नाही, जर गेले तर सरकारमधून बाहेर पडायचे,” असा गौप्यस्फोट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना हा खुलासा केला. चव्हाणांच्या वक्तव्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून महाविकासाआघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केल आहे.

अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकीची आहे. राज्यात सरकार बनवित असतातना दिल्ली आणि मुंबईमध्ये बैठका घेऊन सतत बैठका घेतली. यानंतर किमान समान कार्यक्रम ठरविला यात फक्त शिवसेनेनेच स्वाक्षरी नाही केली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पण स्वाक्षरी केली आहे, असे काॅबिनेटमंत्री नवाब मलिक यांनी चव्हाणांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मलिक पुढे म्हणाले की, आमचा किमान समान कार्यक्रम असे सांगतो की, महाविकासआघाडीचे सरकार हे संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करणार आहे. संविधानाच्या विरोधात सरकारचे पाऊल पडणार नाही. आणि संविधानाच्या उद्देशिकेनुसार काम करण्यास बंधणकारक असणार आहे. चव्हाणांनी बोले वेगळे आहेत. मात्र, त्याचे विधान वेगळ्या पद्धतीने मांडले जात असल्याचे मलिक म्हटले आहे.

“अशोक चव्हाणांचे विधान शब्दश: जावून चालणार नाही. बांधून घेतले म्हणजे फक्त शिवसेनेला बांधून घेतले असे नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि मित्रपक्षांना एकत्र येऊन तयार झालेली महाविकासआघाडी आहे. आम्ही एका विचाराने बांधलो आहोत, या अर्थाने ते म्हणाले, असे म्हणत चव्हाणांच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. रोहित पवार पुढे म्हणाले की, चर्चा ही केली जाते आणि चर्चा केल्यानंतर तेथे जी नेते मंडळी असतात, त्यांनी दिलेला शब्द त्या त्या लोकांनी तो पाळावा. चव्हाणांनी केले वक्तव्य उद्देशाने सहज बोलले गोष्ट आपण गांभीर्यांनी घेऊन चालणार नाही. पाच वर्ष चालणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.”

अशोक चव्हाण नेमके काय म्हणाले

“राजकारण असो की चित्रपट, नाट्य क्षेत्र असो हे तीन ही सारखेच आहेत. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे. मग काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो की उद्धव ठाकरे असो कोणाला वाटेल आमचे तीन पक्ष एकत्र येतील असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचे सरकार हे तीन आम्ही आणले. तीन पक्षाचे सरकार, तीन विचार धारेचे सरकार चालणार कसे?, यावेळी आम्ही आमच्या दिल्लीच्या सरकारला विचारले. तेव्हा ते म्हणाले की, हे सरकार चालणार कसे रोज भांडणे होती. रोज प्रश्न निर्माण होती. सरकार चालविणार कसे, त्यावेळी आम्ही म्हणालो तुम्ही चिंता करून नका, मी मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षाचे सरकार चालवले, त्या आता अजून एका पक्षाची भर, चिंता करायचे कार नाही. परंतु, आमच्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी आम्हाला सांगितले की पहिले हे लिहून घ्या की. संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे या सरकार जाता येणार नाही, एवढ्या कडक सुचना आम्हाला हे सरकार बनविताना दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी ‘मिशन २८’ ठरले प्रभावी

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Aprna

भागवतांकडून भाजपाची पाठराखण

News Desk