HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांनी पुस्तक काढणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना – अस्लम शेख

मुंबई | महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांनी पुस्तक काढणे ही पहिली घटना आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील जुने जाणते नेते आहेत, त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुस्तकाबद्दल केलेल्या वक्तव्यात काही चुकीचं नाही. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना ज्या प्रमाणे पत्र लिहिले त्याप्रमाणेच शरद पवारांनी राज्यपालांना पत्र लिहिले, असं वक्तव्य मुंबई शहरचे पालकमंत्री आणि वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. याविषयी अस्लम शेख यांनी आपला पक्ष मोठा व्हावा हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अजेंडा असतो, असं अस्लम शेख म्हणाले आहेत. शिवसेनेने तशी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपला पक्ष मोठा व्हवाा हे प्रत्येक राजकीय पक्षाचं स्वप्न असतं, असं अस्लम शेख म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गहिनीनाथ गडाच्या पंढरपूर वारीचा मार्ग सरकारने मोकळा करावा, पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

आता कोर्टाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील, राष्ट्रवादीचा उपरोधिक टोला

News Desk

जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती – चंद्रकांत पाटील

News Desk