HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चार आमदारांचे राजीनामे स्वीकारले

मुंबई | येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या हालचालीला वेग आला आहे. भाजप पक्षाविरुद्ध बंडखोरी करणारे आणि धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या चार आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला होता. अनिल गोटे यांच्यासह शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, आणि हर्षवर्धन जाधव यांचा समावेश आहे. बागडे यांनी काल (१५ मे) हे राजीनामे स्वीकारले आहेत

या चारही आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. धुळे महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी केलेल्या आमदार अनिल गोटे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले होते.

वरोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुरेश बाळू धानोरकर यांनी भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे सांगत राजीनामा दिला होता. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिल्याने चिखलीकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ कारणामुळे भाजपकडून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार

News Desk

फक्त हिंदूंच्या सणांवरच निर्बंध लावतात, नारायण राणेंची ठाकरे सरकारवर टीका!

News Desk

राजकीय द्वेषापोटी फोन टॅपिंग; खरा सुत्रधार कोण हे उघड व्हावे – नाना पटोले

News Desk