Site icon HW News Marathi

मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री भाषण करताना विदर्भवादींनी घातला गोंधळ; पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) भाषण करत असताना गोंधळ झाला. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भाच्या (Vidarbha) घोषणा दिल्यामुळे सोहळ्यात एकच खळबळ माजली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना अचानक विदर्भवादी महिला आणि पुरुष प्रेक्षकांमधून वेगळा विदर्भाच्या घोषणा देण्यास सुरुवता केली.

 

दरम्यान, विदर्भवाद्यांनी शेतकरी आत्महत्या थांबल्याच पाहिजे, बेरोजगारी तरुण आत्महत्या करत असून त्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, अशा घोषणा देत होते. पोलिसांनी वेळीच विदर्भवाद्यांना ताब्यात घेतले. “मुख्यमंत्री फक्त फित कापण्यात व्यस्त असून सरकार स्थापन करून त्यांनी खूप मोठी कामगिरी केल्याचे दाखविले आहे. परंतु राज्यात शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत”, असे विदर्भवाद्यांनी माध्यमांशी संवाद म्हटले आहे.

 

 

Exit mobile version