HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझेला पाठीशी घालणारा एक नेता तरी मंत्रिमंडळातून कमी झाला!, भाजपचा टोला  

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी गोळा करायला सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. दरम्यान, आज (५ एप्रिल) या प्रकरणावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून हे प्रकरण CBI कडे वर्ग करण्यात आले आहे. आज गृहमंत्री पदाचा राजीनामा घेऊन अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहेत आणि सुपुर्द करणार आहेत.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही सरकारकडे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आणि आता राजीनाम्या नंतरही भातखळकर यांनी ट्विट केले आहे. गृहमंत्री अनिल देखमुखांचा राजीनामा ठाकरे सरकारची घसरलेली पत दाखवतो. सचिन वाझेला पाठीशी घालणारा एक नेता तरी मंत्रिमंडळातून कमी झाला, असे ट्विट केले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

”उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सीबीआयने पंधरा दिवसांत प्राथमिक चौकशी करावी”, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावरुन एकप्रकारे सीबीआय चौकशी न्यायालयाने मान्य केली असल्याचे फडण‍वीस यांनी म्हटले आहे. हप्तेवसुलीचे काम सरकारच्या आणि मंत्र्यांच्या आशीर्वादाने होत होतं. या प्रकरणात उच्च न्यायालयाने कडक पाऊल उचलले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कशाप्रकारे हप्तावसुली चालली होती. हे सत्य बाहेर येईल. काही लोकांनी सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. हे भासवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला उच्च न्यायालयाने उत्तर दिले, असाही टोला फडणवीसांनी लगावला आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी फडणवीसांनी सचिन वाझे प्रकरणी भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेंची पाठराखण केली. राज्यात गंभीर प्रकार घडल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. हे आश्चर्यकारक आहे. त्यांना आपल्या पदाचा मान राखावा. अन्यथा लोक तुमच्याकडे संशयाने बघतील, असा सूचक इशारा फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंबेनळी घाटात दरीत कोसळलेली बस काढली बाहेर

swarit

ठाण्यात कारमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या

News Desk

शरद पवार-अमित शहा भेटीवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk