HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारची नियतच खोटी, भाजपकडून वीज बिलाच्या रद्दीवरुन सरकारवर टीका 

मुंबई | कोरोनाचा काळात सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेकांचा नोकऱ्या गेल्या. अशात वीज बिल पाहून तर सोकांना शॉकच बसला होता. या वाढीव वीज बिलावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. वीज बिल सरकार कमी करेल अशी आशा असताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी असे सांगितले की कुठलीही वीज बिल माफी मिळणार नाही. त्यानंतर भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

सर्वसामान्यांना मोठा झटका, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं‌ वक्तव्य. ठाकरे सरकारची नियतच खोटी… आधी भूलथापा मारायच्या आणि मग यू टर्न घ्यायचा…, अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. दरम्यान, वीज बिलासाठी ग्राहकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. मात्र, प्रयत्न करुनही सामान्य नागरिकांना वीज बिलात सवलत दिली नसल्याने वीज बिल भरणे गरजेचे असणार आहे.

काय म्हणाले नितीन राऊत?

“लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही”, असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. तुम्ही जसे ग्राहक आहात तसं आम्ही सुद्धा वीज ग्राहक आहोत, आम्हाला सुद्धा वीजेचं बिल द्यावं लागतं. वापरापेक्षा वाढीव बिलं आली असतील त्याची चौकशी सुरु आहे. पण ज्यांनी वीज वापरली आहे त्यांना बिल भरावं लागेल असं नितीन राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीसाठी रामराजे नाईक-निंबाळकर सरसावले!

News Desk

एकनाथ शिंदे यांचा फोटो समोर ठेवत अघोरी जादू टोण्याचा प्रकार, दोन जण अटकेत

News Desk

राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या १० वर, नागरिकांनी घाबरू नये !

swarit