HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर ! भातखळकरांची टीका

मुंबई | रविवार पासूनच मुंबईत पावसाने जोर धरला आहे. या पावसात अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. मुंबईत रविवारी विविध ठिकाणी भूस्खळनाच्या घटना घडून लोकांना आपले प्राण गमवावे लागले. माहुल-विक्रोळी-भांडूप-अंधेरी-कांदिवली अशा विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये शहरात ३२ जणांनी प्राण गमावले. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

मुंबईत रविवारी ३ ठिकणी भिंती कोसळून काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या संदर्भात आता विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर नेम धरला आहे. मुंबईत २५ लोकं पावसामुळे मेली तरीही मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर असं म्हणत भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.

कितीजणांनी आपला जीव गमावला?

-माहुल – १९

-विक्रोळी – १०

-भांडूप – १

-अंधेरी पश्चिम – १

-कांदिवली पूर्व – १

भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत भुस्खलनाच्या दुर्घटना घडण्याआधी मालाड येथील कुरार भागात मेट्रोच्या कामांसाठी झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला विरोध करत आमदार अतुल भातखळकर मैदानात उतरले होते. ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या नागरिकांना नग्न करुन मारहाण केल्याचा आरोपही भातखळकरांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे मला धमकवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांचा मी बाप आहे-संजय राऊत

News Desk

भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं, अनिल परब यांचा विरोधकांना पलटवार

News Desk

कोरोनाची तिसरी लाट उसळण्याची शक्यता, उद्योगांना कामस्वरुपाचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk