HW News Marathi
महाराष्ट्र

…मग दानवे काय ‘शुद्ध घी’वाले आहेत काय ? ED कारवाईवरून बच्चू कडूंचा सवाल

मुंबई “आधी राज ठाकरेंची आणि शरद पवारांची ईडी चौकशी लावली. आता प्रताप सरनाईकांची देखील चौकशी लावली. मग दानवे काय ‘शुद्ध घी’वाले आहेत काय ? भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का नाही?”, असा सवाल राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. ते ‘टीव्ही 9’या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. राज्यात महाविकासआघाडीच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावून केंद्र लोकशाहीची आणि घटनेची पायमल्ली करत असल्याची टीकाही यावेळी बच्चू कडू यांनी केली.

ईडीच्या चौकशीवरून भाजपवर निशाणा साधताना, “भाजपच्या कित्येक नेत्यांनी कितीतरी मोठी संपत्ती जमा केली आहे. मग त्यांच्या एकाही नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही? याआधी राज ठाकरे आणि शरद पवारांवर ईडीची चौकशी लागली. त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांच्यावर चौकशी लागली. मग रावसाहेब दानवे काय शुद्ध घीवाले आहेत का ?”, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. तसेच, “जो बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्याला दाबण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही याचा निषेध करतो”, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निकालानंतर पहिल्यांदा सोनिया गांधींनी शरद पवारांसोबत फोनवर केली चर्चा

News Desk

रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल- मनसेचा इशारा

News Desk

मराठा आरक्षणासाठी अल्टिमेटम नको, मराठा संघटनांना सोबत घेत भूमिका मांडण्याची गरज! – राधाकृष्ण विखे-पाटील

News Desk