HW News Marathi
महाराष्ट्र

लसूण खा, मुळा खा… पण कांदा महाग झाला म्हणून ओरडू नका – बच्चू कडू

अमरावती | एकीकडे राज्यात पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे कांद्याचे भाव ६० रुपयांवर गेल्याने सर्वसामान्यांमध्ये कुजबुज वाढत असली तरी कांद्याच्या दरवाढीचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समर्थन केल आहे. कांद्याचे भाव समाधानकारक असले तरी सर्वसामान्य लोकांनी कांद्याचे भाव वाढले म्हणून ओरडू नका असे आवाहन बच्चू कडु यांनी केलंय. कांद्याचे भाव आणखी वाढले पाहीजे कारण मागील सत्तर वर्षात कांदा उत्पादक शेतकरी लुटला गेला आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

जर कुणाला कांदा जास्तच आवडत असेल पण त्याला भाव जास्त वाटत असेल तर त्यांनी लसूण खा, मुळा खा… पण कांदा महाग झाला म्हणून ओरडू नका असा सल्ला बच्चू कडु यांनी दिला आहे. यावर्षी कांदा काढणीच्या वेळेला अवकाळी पाऊस आल्याचे कांदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता कांद्याचे भाव ६० रुपयांवर गेल्याने सर्वसामान्यांची धांदल उडाली आहे. परंतु कांद्याचे भाव वाढले म्हणणाऱ्यांना बच्चू कडू यांनी खडे बोल सुनावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते, पण धनंजय मुंडेंना लाज वाटत नाही!

News Desk

जाणून घ्या… उद्धव ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार ?

News Desk

.तर २०१९ मध्ये भाजप सत्तेतून हद्दपार

News Desk