HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील तळीये दुर्घटनेतील मृतांचे बळी वाढतेच, थोरातांकडून आकडा वाढण्याची भीती

मुंबई | महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु आहे. गेल्या काही दिवसांत पावसामुळे तब्बल १२९ नागरिकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राज्यातील काही भागात दरड कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढल्याचं थोरात म्हणाले. काल(२२ जुलै) झालेल्या मुसळधार पावसानंतर रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात मिळून एकूण 5 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

महाड तालुक्यातील तळीये गावात भीषण दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. राज्यभरात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या १२९ वर पोहोचली आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.

पोलादपूर तालुक्यात भूस्खलन, ११ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी गावातही भूस्खलन झालं आहे. महाडच्या तळीये गावाप्रमाणेच पोलादपूर तालुक्यातील या दोन्ही गावात डोंगराचा काही भाग कोसळला. त्यात काही घरं गाडली गेली. त्यामुळे या दोन्ही गावातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळतेय.

चिपळूण आणि खेड तालुक्यातही दरड कोसळली

चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे १७ जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये १७ घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमई इथं दरड कोसळलून २ जण दगावले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खेडमधील धामणंदच्या दुर्घटनेनंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर आरक्षणाच्या आंदोलकांची प्रकृती खालावली

News Desk

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर गोवऱ्या पेटवल्याने खळबळ, मराठा आरक्षणाचे साताऱ्यात पडसाद

News Desk

या शिवमंदिरात फडकवला जातो तिरंगा !

News Desk