HW News Marathi
महाराष्ट्र

बागायती क्षेत्राच्या हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पवार साहेबांचा एक फोन पुरेसा – बाळासाहेब थोरात

अहमदनगर | राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरमधील के. के. रेंजच्या जमीन हस्तांतराला विरोध केला आहे. निर्णय काहीही असो या भागातील आदिवासी आणि शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही या भूमिकेवर आपण ठाम आहोत. बागायती क्षेत्राचे हस्तांतर मनात आणणे हेच पाप असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी या प्रकरणी शरद पवार यांचे सहकार्य घेण्यात येईल, असे नमूद केले. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पवार साहेबांचा एक फोन पुरेसा आहे, असेही थोरात यांनी सांगितले आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “या भागातील जमिनी बागायती आहेत. शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने त्या विकसित केल्या आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात धनगर आणि आदिवासी समाज आहे. लष्कराकडून राज्य शासनाने जमीन हस्तांतरीत करुन घेतली असेल, तर त्या बदल्यात लष्कराला जमीन हस्तांतरीत करणे बंधनकारक असते. परंतू त्यासाठी नगर जिल्ह्यातीलच जमीन देणे बंधनकारक नाही.”

“फडणवीस सरकारच्या काळात जमीन हस्तांतरप्रश्‍नी काही निर्णय झालेला आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येईल. निर्णय काहीही असो या भागातील आदिवासी आणि शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही. बागायती क्षेत्राचे हस्तांतर मनात आणणे हेच पाप आहे. या प्रकरणी शरद पवार यांचे सहकार्य घेण्यात येईल. त्यांची भेट घेउन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याजवळ जमीन हस्तांतरणास ठाम विरोध दर्शविला जाईल. शासनाने लष्करास इतर ठिकाणची जमीन हस्तांतरीत करण्याचा पर्याय निवडावा,” असेही त्यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय आजच, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

News Desk

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी नाना पटोलें सायकलवरून विधानभवनात येणार

News Desk

फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंकडून रश्मी शुक्ला यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

Aprna