HW News Marathi
महाराष्ट्र

बंडातात्या कराडकर ‘गनिमी काव्याने’ पंढपूरला जाणार, पोलीस झाले सतर्क

पंढरपूर |  यंदाही कोरोनाच्या सावटामुळे आषाढी वारी साध्या पद्धतीने साजरी केली जात आहे. पायी वारीही रद्द करण्यात आली आहे. अशात दिवसांपूर्वी पायी वारी काढण्यावर ठाम असलेले ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर आज (२० जुलै) पंढरपुरात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पोलिसांना चकवा देऊन बंडातात्या पंढरपुरात येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर परिसरात पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंढरपुरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मानाच्या पालख्या आणि मोजक्या वारकऱ्यांशिवाय इतर कोणालाही पंढरपुरात प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यामुळे आता बंडातात्या कराडकर नेमके काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या आधीही बंडातात्या कराडकरांनी पोलिसांना चकवा देत आळंदी ते पंढरपूर पायी वारी काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पुण्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर बंडातात्या कराडकर आणि विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांच्या पंढरपुरात जाण्याच्या शक्यतेमुळे संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर साताऱ्याहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.

‘बंड्यातात्या कराडकरांच्या अटकेवर फडणवीसांचा निषेध’, सरकारला सुनावले बोल

महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षामध्ये वादविवाद नेहमीच सुरूच असतात. नवीन वादाचं कारण म्हणजे बंड्यातात्या कराडकर यांच्या अटकेचा आहे. बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांनी निषेध व्यक्त केली आहे. वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान?, असे सवाल देवेंद्र फडणवीसांनी सरकारला केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : जाणून घ्या…संचार बंदीमध्ये काय सुरू असणार, तर काय बंद

swarit

आता मराठा समाजाच्या मुलांनी पुढे काय करायचं हे सरकारनं सांगावं? संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ‘पुन:श्च हरीओम’, ‘मिशिन बिगिन अगेन’ घोषणामुळे गोंधळ वाढला। देवेंद्र फडणवीस

News Desk