HW News Marathi
महाराष्ट्र

“बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना”अमोल मिटकरींची भाजपच्या आंदोलनावर टिका

मुंबई। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केलं आहे.दुसरीकडे या निर्णयाविरोधात समाजात प्रचंड असंतोष असताना निवडणुक आयोगाने ५ जिल्हा परिषद आणि ३० पेक्षा जास्त पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीक केला आहे.भाजपने आज आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. त्या आंदोलनावर आता राष्ट्रवादीने टीका करण्यास सुरवात केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत भाजपच्या आंदोलनावर टिका केली आहे. भाजपचं ओबीसी आंदोलन म्हणजे, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे.आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत असताना भाजपला मात्र सोयीने छत्रपती शाहु महाराज यांचा विसर पडलेला दिसतोय. सुडबुद्धीने वागणारी भाजपची मंडळी किती दुटप्पी आहेत हे यावरून दिसते. आंदोलन आपला हक्क आहे मात्र, सोयीचं राजकारण जास्त दिवस टिकत नसतं,असं मिटकरींनी म्हटलयं.

फडणवीसांना घेतलं ताब्यात

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं, असा आरोप त्यांनी केला. सरकारला येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्यात, असा आरोपही त्यांनी केली. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना

ताब्यात घेतलं.

चंद्रकांत पाटलांचा एल्गार

संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे. ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. जो पर्यंत महाराष्ट्र सरकार डाटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आंदोलनानंतर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.चंद्रकांत पाटील म्हणाले, जर भाजपने ओबीसी समाजाचे आरक्षण घालवले असा आरोप होत असेल, तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये कोणत्याही दिवशी चर्चेला तयार आहे. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर चर्चा होऊ दे, किमान त्यानंतर तरी जनतेच्या लक्षात येईल की ओबीसी आरक्षण नेमकं कुणामुळे रद्द झालं”

जयंत पाटलांची टिका

भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे, ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ अस ट्वीट करत जयंत पाटील यांनी आज चालू असलेल्या चक्का जाम आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.जयंत पाटील म्हणाले की, राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजुभाऊ कोंगे याचा उपोषणाचा इशारा

News Desk

आज भाजपची पहिली यादी जाहीर होणार ?

News Desk

“हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा” – उदयनराजे भोसले

News Desk