HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य,…तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (Bhagat Singh Koshyari controversial statement) कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान करताना म्हटलेय, जर गुजराती आणि राजस्थानी नसते तर मुंबईचे आर्थिक महत्व कसे निर्माण झाले असते. यावरुन आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.

अंधेरीत राज्यपाल म्हणाले, “मी लोकांना कधी-कधी सांगत असतो की जर गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून बाजुला केले, तर तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत.”

मुंबईतून गुजराती, राजस्थानी वगळले तर मुंबईकडे काय राहिल ? मुंबई आर्थिक राजधानी कशी राहिल ? असं वक्तव्य कोश्यारींनी केले आहे. गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत, तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

 

महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असं आमदार मिटकरींनी म्हटलं आहे.

कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे संजय राऊत

 

महाराष्ट्राने गुजराती आणि राजस्थानी लोकांना पोसले आणि मोठे केले. अदानी-अंबानी या राज्यात मोठे झाले. आज हे वक्तव्य करून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. यासाठी त्यांनी तमाम मराठी बांधवांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून, भाजपने यांना परत बोलवावे, असेही नाना म्हणाले

 

राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करत आहेत,असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. राज्यपालांची तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाट न पाहता ट्विटरवरून आत्ताच्या आताच्या आता पंतप्रधानांकडे पत्र लिहून तक्रार करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या एक दिग्गज नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

कोरोना संकटातही राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक! – नाना पटोले

News Desk

“उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे”,अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk