HW News Marathi
महाराष्ट्र

कंगना राणावत प्रकरणात राज्यापालांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्र्यांबद्दल व्यक्त केली नाराजी

मुंबई । “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना राणावत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली”, असे म्हणत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणात राज्यपालांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाला आता कोणते वळण मिळणार हे पाहणे महत्वाचे आहे.

राज्यपालांनी अजॉय मेहता यांना राजभवनात बोलवून या प्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर राज्यपाल कोश्यारी या वादासंदर्भात केंद्र सरकारकडे अहवाल देण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने दिले आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेने कंगना राणावतच्या वांद्र्यातील कार्यालय पाडण्यासाठी दाखवलेल्या घाईबाबत राज्यपालांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.

“सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आली आहे. तुम्ही सहमत आहात का?”, असे ट्विट कंगनाने कालच (९ सप्टेंबर) केले होते. त्यानंतर, या प्रकरणी चर्चा करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी अजॉय मेहता यांना राजभवनावर बोलवून घेतले. दरम्यान, सुरुवातीपासूनच राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये असलेले मतभेद लक्षात घेता या प्रकरणाला नेमके काय वळण मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा – निलेश राणे

News Desk

#CoronaInMaharashtra | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १२५ वरून थेट १३१ वर

News Desk

मोठी बातमी ! पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

News Desk