HW News Marathi
महाराष्ट्र

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ

मुंबई | आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली आहे. त्या शाळांमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंगळवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात या १३ शाळांची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे उपस्थित होते. निवड करण्यात आलेल्या या १३ शाळांना ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे संबोधण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अटलजींनी नेहमीच विविध क्षेत्रात सर्व पध्दतीने विकास करुन देशाला दिशा दिली, देशाच्या विकासाचा दर वाढविला. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीयांना भारतातच आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचा शुभारंभ म्हणजेच अटलजींना खऱ्या अर्थाने ही श्रध्दांजली आहे.

राज्यातील मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, त्याचप्रमाणे त्यांना जगातल्या विविध भागाचे ज्ञान व्हावे या उद्देशाने राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील १०० शाळांना आंतरराष्ट्रीय शाळांचा दर्जा देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदुरबार, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, वाशिम या १३ जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

या शाळांच्या निवडीसाठी विविध प्रकारचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय शाळांसाठी घटकांचा पुढाकार, शाळेतील विद्यार्थी पटसंख्या, मूलभूत पायाभूत सुविधा ज्यामध्ये शाळेची प्रवेश क्षमता, इंटरनेट सुविधा, स्वच्छ परिसर, तंत्रज्ञानाच्या वापरासाठीच्या सुविधा, विद्यार्थ्यांची वाहतूक सुविधा अशा अनेक निकषांच्या आधारे या शाळांची निवड करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वसामान्यांचे आधारवड व्हा; पोलीस दलाची शान वाढवा! – अजित पवार

Aprna

आता वाढला नव्या व्हेरियंटचा धोका;, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला ‘हा’ इशारा

News Desk

शेतकऱ्यांनी ‘लाँगमार्च’ आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Aprna