HW News Marathi
महाराष्ट्र

“गोपीचंद पडळकर कुणाला भिणाऱ्याची औलाद नाही”

सोलापूर | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर कायमच महाविकासआघाडी सरकारवर टीका करत असतात. तर दुसरीकडे अनेक मागण्याही वारंवार ते करत असतात. आताही पडळकरांनी एक विधान केलं आहे. गावगाड्यातील सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. तो न्याय सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी आपण उघडपणे सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यास तयार आहे. सोलापूर येथील कार्यक्रमातील घोंगडी बैठकीत माझ्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा गोपीचंद पडळकर कुणाला भिणाऱ्याची औलाद नाही, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकरांनी विरोधकांना दिला.

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आमदार पडळकर हे मंगळवेढा तालुक्यात घोंगडी बैठका घेत आहेत. निंबोणी येथील बैठकीत आमदार पडळकर यांनी च्या दौऱ्यावर आहेत. ग्रामीण भागातील देवळाच्या वर्गणीची यादी गहाळ केल्यासारखे राज्य सरकारने 346 जातींचा समावेश असलेली ओबीसींची यादी न्यायालयात सादर करू शकत नाहीत, असे सांगितले आहे. यादी नाही म्हटल्यामुळे ती गहाळ केल्याचा आरोप विधान परिषद सदस्य पडळकर यांनी घोंगडी बैठकीच्या निमित्ताने केला आहे.

आमदार पडळकर म्हणाले की, राज्यातील सरकारच्या दुर्लक्षामुळे आज ओबीसींचे राजकारणातील आरक्षण गेले, उद्या नोकरीतीलही जाईल. त्यासाठी सर्व समाजांनी जागृतपणे या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तयार राहावे. या छोट्या समाजाला भेटून त्यांच्या अडचणी जाणून राज्य सरकारच्या मानगुटीवर बसवण्यासाठी गावोगावी दौरे करत आहे. पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारकडून ओबीसींवर सातत्याने अन्याय केला आहे, त्यासाठी 346 जातीने आता जागृत व्हायला हवे.

राजकारणात ठराविक जातीचे वर्चस्व असल्याने अल्प असलेल्या समाजाला राजकीय आरक्षणापासून बाजूला ठेवल्यास खुल्या जागेत अल्पसंख्याक समाज टिकाव धरू शकत नाही. त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या जागेतून तो निवडणूक लढवू शकणार आहे, त्यातून तो आपले कर्तृत्व सिद्ध करणार आहे. गावगाड्यातील सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण उघडपणे सरकार विरोधी भूमिका घेण्यास तयार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात संघर्ष करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. त्यानंतर पाच हा वर्षे निवडणुका नसल्यामुळे तुमच्या प्रश्नाची राज्य सरकारकडून दखल घेतली जाणार नाही. राज्य सरकारकडून सध्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात केवळ केंद्राकडे बोट दाखवले जात आहे, असा आरोपही आमदार पडळकर यांनी राज्य सरकारवर केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचा पायाखालचा मतदारवर्ग घसरत चाललाय, शेलारांचा सेनेला टोला

News Desk

“माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मी घाबरून घरात बसलो तर यांनी कोणाच्या दारात बसायचं” – निलेश लंके

News Desk

अनिल देशमुख राजीनामा देऊन थेट दिल्लीला रवाना

News Desk