HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने ! अर्णबवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा भाजपकडून निषेध …

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली.2018 साली झालेल्या अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले.यावरून आता भाजपचे नेते महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढताना दिसत आहेत.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि आशिष शेलार यांनी महाराष्ट्रात आणीबाणी सुरू असल्याची टिका केली आहे. अतुल भातखळकर म्हणतात की,“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामीना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये. धिक्कार..”

दुसरीकडे आशिष शेलार यांनीसुद्धा ट्विट केले आहे की , “ एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक…सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले…

आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार!काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस…महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने?“

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमचा लढा वाडाविरोध गावगाडा”, म्हणत सदाभाऊ खोतांनी केतकीचे केले समर्थन

Aprna

महाराष्ट्रात कोरोनाचा सातवा बळी,  कोरोनाग्रस्त ४० वर्षीय महिलेचा मुंबईत मृत्यू

swarit

‘राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा’, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी!

News Desk