HW News Marathi
महाराष्ट्र

संजय पांडेंना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निलंबित करा, सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | “बोगस एफआयआर प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ताबडतोप निलंबित केले पाहिजे,” अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. या प्रकरणी सोमय्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनिल राणे आणि मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि अर्धा डझन वकिलांसह राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची आज (२७ एप्रिल) दुपारी भेट घेतली. मुंबई पोलीस आयुक्तांवर कारवाई करणार असल्याचे राज्यपालांनी आश्वासन दिल्याची माहिती सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

सोमय्या म्हणाले, “आम्ही राज्यपालांशी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी कशा पद्धतीने ते बोगस एफआयआरवर खार पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात सांगितले. या संबंधित पुरावे दिले आहेत. सर्वात पहिली बाबा ही आहे की संजय पांडेंना मुख्यमंत्र्यांनी ताबडतोप पोलीस आयुक्त पदावरून निलंबित केले पाहिजे. खार पोलीस स्टेशनने मान्य केले. मुंबई पोलीस आयुक्तांनी आमच्याकडे वांद्रे पोलीस स्टेशनचा एफआयआर पाठविला आहे. आणि त्या एफआयआरवर ना पोलीस आयुक्तांची सही आहे. उद्धव ठाकरेंचे उद्धट सरकार आणि पोलीस आयुक्त कशी बनवाबनवी करते. ते जे ७०-८० शिवसेनेचे गुंड होते. त्यांना वाचवण्यासाठी बोगस एफआयआर घेतली. राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की, पहिले पोलीस आयुक्ताला बोगस एफआयआरविरोधात कारवाई करा. ही बोगस एफआयआर रद्द करा. आता ८४ तास झाले तरी उद्धव ठाकरे सरकार खरी एफआयआर का दाखल करू घेत नाही. 

आम्हाला न्याय मिळला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात पण जाणार

 ” आज किरीट सोमय्या तुमच्या समोर उभा आहे. तो देव आणि सीआयएसएफ कमांडोमुळे उभी आहे. पांडे हे किती खोटे बोलत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त हे मुख्यमंत्र्यांची किती चमच्यागिरी करत आहेत. कमांडो काय करत होते. तुमच्या सर्वांमुळे मी वाचलो. तुम्ही जे लाईव्ह दाखवित होतात. त्या कशा पद्धतीने पोलीस स्टेशनच्या बाहेर गाडी आली. या जवानांनी चालत चालत त्यांच्यावर लाठ्या-काठ्या, चपला आणि दगड आले तरी त्यांनी मला वाचविले. या जवानांनी माझी गाडीबाहरे काढली. आणि दुसरी गोष्टी माझ्या गाडीची काच दगडामुळे फुटली. आणि माझ्या चेहऱ्यावर जी काच्चेचा तुकडा लागला यात मी थोडा जखमी झाली. या सर्वांचा पंचनामा संजय पांडेंच्या पोलिसांनी केला आहे. मी देवाच्या कृपेने वाचलो आहे. परंतु, उद्धव ठाकरे आणि माफिया सेनेची ही इच्छा होती, की किरीट सोमय्या जिवत कसा राहिला. त्या खार पोलीस स्टेशनमध्ये जे ८० गुंडे होते, ते घुसले कसे ते दारात उभे होते. त्यांच्यावर पांडेंनी का कारवाई केली नाही. आम्हाला न्याय मिळला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात पण जाणार आहे, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. पण, बोगस एफआयार प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांवर कारवाई आणि पोलिसांनी आम्हाला ऑल क्लिअर दिल्यानंतर ते गायप झाले आहे. आणि गुंडाच्या हवाले किरीट सोमय्याला सोपविले. राज्यापालांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, या प्रकरणाची निश्चित चौकशी करणार,” असे सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुलजी गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन म्हणजे हीन राजकारण! – बाळासाहेब थोरात

Aprna

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

Aprna

राज्यसभेतील भाजपा खासदारांची संख्या पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली नाराजी!

News Desk