HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतल्या मोदी-ठाकरे भेटीनंतर महाराष्ट्रातही भाजपच्या नेत्यांनी बोलवली बैठक

मुंबई | आज (८ जून) राजकीय वर्तृळात अनेक घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित आहेत. दरम्यान, दिल्लीत मोदी-ठाकरेंच्या बैठकीनंतर आता महाराष्ट्रात भाजपच्या कोअर कमिटीने एक महत्वाची बैठक बोलवली आहे. ही बैठक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या बैठकीचे महाराष्ट्रात काय पडसाद उमटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिलं होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते. त्यामुळे मोदी ठाकरे भेटीनंतर मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधील १२ पोलीस झाले दहशतवादयांना सामील

News Desk

निर्मला सीतारमण आज लोकसभेत मांडणार अर्थसंकल्प

swarit

सुशांतची हत्या झालेली नाही, AIIMSकडून शिक्कामोर्तब

News Desk