HW News Marathi
महाराष्ट्र

बोगस FIR प्रकरणी सोमय्या आज राज्यपालांची घेणार भेट

मुंबई। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ राज्यापाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. खार पोलिसांनी बोगस एफआयआर विरोधात तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे सोमय्या आज (२७ एप्रिल) भेट घेणार आहे. या प्रकरणी सोमय्या काल (२६ एप्रिल) खार पोलीस ठाण्यात गेले होते. सोमय्या काल खार पोलीस ठाण्यात तब्बल दीड तास होते. यानंतर ही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही.

सोमय्या बाहेर आल्यानंतर ते म्हणाले, “वेबसाईटवर असलेल्या एफआयआरवर माझी सही नाही, हे खार पोलिसांनी मान्य केले. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मुंबई पोलीस आयुक्तांचा एफआयआर नोंदवण्यास नकार दिला आहे. बनावट एफआयआरच्या आधारावर तपासही सुरू झाला आहे. एफआयआरवर माझी सही हवी होती यांची मुंबई आयुक्तांना पूर्ण कल्पना आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून खार पोलिसांनी पेपर फाडून टाकले असून खार पोलिसांना आयुक्तांचा फोन आल्यानंतर त्यांनी पेपर फोडले,” असे त्यांनी सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण

राणा दाम्पत्याना हनुमान चालिसा प्रकरणी २३ एप्रिलला पोलिसांनी अटक केले होते. राणा दाम्पत्याना भेटण्यासाठी सोमय्या हे खार पोलीस स्टेशनला गेले होते. सोमय्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येण्यापूर्वी पोलिसांना आपण येणार असल्याची माहिती दिली होती. जेव्हा सोमय्यांची गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. तेव्हा सोमय्यांच्या गाडीवर चप्पल आणि दगडफेक झाली असून यात सोमय्या जखमी झाले होते. मी पोलीस स्टेशनला रात्री साडे नऊच्या सुमारास येणार असल्याचे कळावले होते. मी पोलीस स्टेशनला येण्याआधीच ७० ते ८० शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशनच्या आवारात आणि दराजवळ जमले होते. माझी गाडी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर शिवीगाळ करण्यात आली. आणि माझी गाडी थांबवण्याचाही प्रयत्न केला असून मी परत जात असताना तरही माझ्यावर हल्ला झाला. मी जबाबदारी म्हणून पोलिसांना सांगितले. परंतु ते म्हटले की आम्ही सगळी व्यवस्था केली असून पोलीस स्थानकाचे दार उघडताच बाहेर असलेले ७० ते ८० गुंडांच्या हवाले माझी गाडी दिली. हे सर्व पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केले. यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील नेत्यांमुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल – सामना

News Desk

“मुलाच्या मतदार संघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री”

News Desk

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी पक्ष १ कोटी पत्र पंतप्रधानांना पाठवणार

News Desk