HW News Marathi
महाराष्ट्र

“साहेब, किती हा भाबडेपणा?”; फडणवीसांनी शरद पवारांना डिवचलं

मुंबई । “तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावलं असं सांगणं म्हणजे किती हा भाबडेपणा?”, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण साहजिकपणेच चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर, विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यावर, शरद पवार यांनीही विरोधकांना टोले लगावले. पवारांच्या या टिकेवर पुढे देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत प्रत्युतर दिलं आहे.

महाविकास आघाडीत मंत्रीपदाचा निर्णय कसा झाला याबाबत सांगताना शरद पवारांनी त्यावेळी घडलेला किस्सा सांगितला. ज्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पवारांना डिवचलं आहे. “द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्याने महाभारत घडलं आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावलं, असं सांगणं म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!” असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

…तेव्हा मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला!

“मी ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचं, यासंबंधी दोन-तीन नावं आमच्याकडे आलेली होती. उद्धव ठाकरे ही बाब मान्य करायला तयार नव्हते. ते माझ्या शेजारी बसले होते. शेवटी विचारलं काय करायचं? कुणाला करायचं? उद्धव ठाकरेंचा हात मी हातात धरला आणि तो हात मी वर केला आणि सांगितलं हेच होतील. त्यांची त्या ठिकाणी हात वर करायची तयारी नव्हती, त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी नव्हती. त्यांना अक्षरशा सक्तीने मी हात वर करायला लावला”, असं शरद पवार शनिवारी (१६ ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

तो माझा आग्रह होता!

बाळासाहेबांचे आणि माझे राजकीय मतभेद होते पण व्यक्तिगत सलोखाही अत्यंत जवळचा होता. ते दिलदार गृहस्थ होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी योगदान दिलं आहे. महाविकासआघाडीचं सरकार बनवण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा तीन पक्षांमध्ये सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा नेता करण्याचं ठरल्यानंतर आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला आपण भाग पाडावं असा माझा विचार होता. म्हणूनच, मी सक्तीने त्यांचा हात वर केला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं”, असंही यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

“फडणवीसांनी कृपा करून…”

“माझी फडणवीसांना अशी विनंती ही आहे, की कृपा करून या गोष्टीत त्यांनी आक्षेप घेऊ नका. फडणवीस यांनी पाच वर्षे उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा परस्परांचा परिचय निश्चित आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर आता असे आरोप करणं योग्य वाटत नाही. जी वस्तूस्थिती आहे ती मी आज आपल्या सर्वांसमोर मुद्दाम सांगतो” असं यावेळी शरद पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका !

News Desk

राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk

हुकूमशाही पध्दतीने मोदी सरकार प्रत्येक गोष्टीचा भाव वाढवतंय; राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

News Desk