HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी मलिकांवर FIR दाखल करून चौकशी करावी!; शेलारांची मागणी

मुंबई | राज्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा विधान परिषदेचं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एफआयआर दाखल करावा करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच सलीम पटेल आणि सरदार शहाबली खान यांच्याशी झालेल्या व्यवहाराची माहितीही मलिकांनी पत्रकार परिषदेतून कबुली दिल्याचंही शेलारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

मलिकांनी १९९३ बॉम्ब ब्लास्टच्या गुन्हेगाऱ्या कडून जमीन खरेदी व्यवहार केल्याचे सर्व पुरावे फडणवीसांनी आज (९ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलं आहे. मग आता मुख्यमंत्र्यांनी मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का ?, असा सवाल शेलारांनी विचारला आहे. तसेच मुख्यमंत्री मलिकांविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी शेलारांनी केली आहे.

जमिनीचा व्यवहार नेमका कसा झाला

मुबंईतील कुर्ल्यात एलबीएस रोडवर जमीन खरेदी केली. या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम खान याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. सॉलिडस कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. तसेच सॉलिडसला ही जागा केवळ ३० लाखात विकली गेली. यात मलिक या कंपनीत २०१९पर्यंत होतं. मलिक हे मंत्री झाल्यावर त्यांनी त्या कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला होता. ही जमीन त्यांनी खरेदी केली. तेव्हा जमिनीची किंमत रेट २ हजार स्क्वेअर फुटनं केली गेली. अंडरवर्ल्ड करुन खरेदी केलेली जमीन ३० लाखात खरेदी केली गेली. पेमेंट झालं २० लाख. सलीम पटेलच्या अकाऊंटवर हे १५ लाख रुपये गेले. उर्वरित रक्कम शाह वली खानला मिळाले.

फडणवीस पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणालं

मुंबईतील १९९३ बॉम्ब ब्लास्ट आरोपींकडून मलिकांनी कोट्यांवधीच्या जमिनी ३० लाखांत खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे. कुर्ला येथे जमीन खरेदी व्यवहार केला असून बॉम्ब ब्लास्टमधील आरोपींविरोधात टाडा लागला होता. टाडा लागलेल्या आरोपींची संपत्ती जप्त केली जाते. मात्र, ही मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी मलिकांनी कवडी मोलाच्या किंमतीत खरेदी केली का ?, असा सवाल फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आंबे खाल्यावर मुलं होतात हे सांगणाऱ्यांनी…”जयंत पाटलांनी संभाजी भिडेंना खडसावलं!

News Desk

दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागात ३ घरे कोसळली, १ मृत्यू

News Desk

प्राचार्य चव्हाणांच्या निलंबनासाठी विद्यार्थ्यांचं उपोषण

News Desk