HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने काँग्रेसला दिलेला शब्द पाळला, राज्यसभा पोटनिवडणूकीतून घेणार माघार

मुंबई। भाजपने काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीसांना महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करुन देत पोटनिवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. अखेर भाजपने उमेदवारी माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून पोटनिवडणूकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसंची विनंती भाजपकडून मान्य करण्यात आली असल्यामुळे आता रजनी पाटील बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे

काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या जागेवर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपचे संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाल्यास ती निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीसांना महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करुन देत निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याची विनंती केली आहे. यावर फडणवीस यांनी कोर कमिटीशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असा शब्द दिला होता.

मित्राने मित्राचा शब्द पाळला!

महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली होती. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं देखील पटोलेंनी स्पष्ट केलं होतं. आज अखेर चार दिवसांनंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याचं भाजपने जाहीर करुन काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे.

कोण आहेत रजनी पाटील?

रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता जम्मू आणि काश्मीरच्या त्या काँग्रेस प्रभारी आहेत. ठाकरे सरकारनं ज्या 12 नेत्यांची नाव विधान परिषदेवर घेण्यासाठी राज्यपालांकडे पाठवलेली आहेत. त्यात काँग्रेसनं रजनी पाटील यांचंही नाव दिलेलं आहे. 1996 साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेतून केलेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : हे सरकार चोऱ्या करायला बसले; पडळकरांचे सरकारवर हल्लाबोल

Aprna

“आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा”, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर

News Desk

‘ई-कुबेर’प्रणालीमुळे उपकोषागार कार्यालयाचे कामकाज जलद, सुलभ, सुरक्षित, विश्वासार्ह होण्यास मदत होईल! – अजित पवार

News Desk