HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धवजी, टीम इंडिया समजून काम करा…अजून वेळ गेली नाही !

मुंबई । मुंबई मेट्रो कारशेडचा मुद्दा आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे येऊन थांबला आहे. कांजूरमार्गच्या केंद्राच्या मालकीच्या जागेवरून न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यामुळे आता हा प्रकल्प बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे हलविण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे. यावरूनच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. “उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचा मुद्दा टीम इंडिया म्हणून हाताळायला हवा”, असे चंद्रकांत पाटील म्हणतात.

“भाजपाच्या कार्यकाळातच मेट्रो कारशेडचे ८० टक्के काम झाले आहे. मुख्यमंत्र्यांकडे संधी होती मात्र इगोमुळे मुंबईच्या हिताचा निर्णय त्यांनी घेतला नाही”, अशी टीका देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली. “चुकीच्या नियोजनामुळे मेट्रो कारशेडचे प्रकरण आणखी चिघळत चालले आहे. तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर त्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन करू शकले असते”, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

“मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर रविवारी (२० डिसेंबर) तुम्ही दिलेले सर्व निवेदन अपूर्ण आहे आणि ते जनतेला भ्रमात पाडणारे आहेत, पण आताही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधानांची आणि केंद्रातील इतर मंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढावा”, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचा खडसेंच्या भेटीवर खुलासा!

News Desk

निता अंबानी साईबाबांच्या चरणी

News Desk

शिवसेना युतीत एवढी वर्ष सडली, आणि १२४ वर अडली !

News Desk