HW News Marathi
महाराष्ट्र

“भय इथले संपत नाही”, चित्रा वाघ यांचा सरकारवर निशाणा

मुंबई। मुंबईला हादरवून टाकणारी घटना साकीनाका परिसरात घडली आहे. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला गेला. दुर्दैवाने या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा दोष मात्र भाजप पक्षाने सरकारला दिला आहे. साकारवार भाजपकडून टीकांचं सत्र चालू आहे. यातच आता अजून एक भयानक घटना समोर अली आहे. हिसर येथे ७ वर्षीय तर बोईसर येथे १२ वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. यावर भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाष्य केलं आहे.

भय इथले संपत नाही

चित्रा वाघ यांनी ट्विट करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. “आज पुन्हा एकदा दहिसरमध्ये ७ वर्षांच्या तर बोईसर मध्ये १२ वर्ष्यांच्या अशाच पद्धतीचा किळसवाणा घाणेरडा बलात्काराचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आज सर्वज्ञानी संजयजी राऊत यांची मी स्टेटमेंट ऐकली कि आतापर्यंतच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे महिलांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे आणि राज्यात लेकी सुनांना मन सन्मान दिला जातोय आहे, आम्ही बघितलंय संजयजी हे सरकार लोक लोकदर्जेने नाही तर सत्ताधाऱ्यांचं सरकार आहे, कारण त्याच्यामध्ये बघा तुम्ही आजपर्यंत या सरकारने महिला आयोगाला अध्यक्ष दिलं नाही, एवढंच नाही तर ज्योती देवरे नावाच्या महिला तहसीलदार यांच्या खच्चीकरण करण्यात आलं”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

जखमी महिलेला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आरोपीविरोधात 307, 376 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मोहन या आरोपीला संशयावरुन ताब्यात घेतलं आहे. तो जोनपूरचा रहिवासी आहे. या आरोपीच्या अंगावर रक्ताचे डाग होते. न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील एक महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू, असा दावाही मुंबई पोलिस आयुक्तांनी केला आहे.

महिलेचा जबाब नोंद करता आला नाही

“साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल केली जाईल.”, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

“साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे.”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. “हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका!

News Desk

आज स्त्री शिक्षणाचे दालन खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची जयंती

News Desk

ज्येष्ठ नाटककार जयंत पवारांचं निधन!

News Desk