HW News Marathi
महाराष्ट्र

दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय, देवेंद्र फडणवीसांची टीका

मुंबई | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यावेळी १४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, १४ आणि १५ तारखेला होणारं दोन दिवसीय अधिवेशन मान्य नाही, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

दोन दिवसांचं अधिवेशन होतंय, आमचा आग्रह होता की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकरी अडचणीत आहेत, कापूस, सोयाबीनचं मोठ नुकसान झालंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ओबीसींमध्ये भीतीचं वातावरण आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला खडे बोल सुनावले जात आहेत. विधानभवन हे महत्त्वाचं स्थान असताना दोन दिवसांचे अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपलं घराणं कुठलं? आणि आपण…, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल

News Desk

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करणार! – देवेंद्र फडणवीस

Aprna

राजकीय नेत्यांसंबंधी केलेलं ‘ते’ वक्तव्य बंडातात्यांना भोवलं; पोलिसांनी घेतलं ताब्यात

News Desk