HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्माचाऱ्यांची अवस्था मिल कामगारांप्रमाणे करण्याचा डाव; पडळकरांचा सरकारवर आरोप

मुंबई | एसटी कर्माचाऱ्यांची अवस्था मिल कामगारांप्रमाणे करण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केला. पडळकर पुढे म्हणाले, “ज्या पद्धतीने मुंबई मिल कामगारांचा संप झाला आणि तो संप चिघळवला गेला. तसाच अनिर्णयक ठेवून मिल मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोंची टक्केवारी गोळा केली. त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून विविध शहरातील करोडोंच्या जमिनीचा विल्हेवाट लावण्याचा परबांचा डाव दिसतोय”

पडळकरांनी ट्वीट करत आज (११ डिसेंबर) व्हिडिओ पोस्ट करत परब आणि सरकारवर टीका केली आहे. “गेल्या तीन आठवड्यातच्या कालावधी गेल्यानंतर सुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्माचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयश ठरले आहेत. आणि आता ते मुघलशाही पद्धतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या या गोष्टीचा जाहीर निशेष करतो, असे पडळकर म्हणाले आहे.”

“पहिवहन मंत्री अनिल परब यांनी आपले अपयश झाकण्यासाठी, मी आणि सदाभाऊ खोत एस.टी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवत आहोत, असे वारंवार आरोप केले आहेत. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत.” अशी टीका आमदार पडळकर यांनी केली आहे.

पडळकर नेमके काय म्हणाले

“परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपले अपयश झाकण्यासाठी मी आणि माननीय सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवत आहेत, असे वारंवार आरोप केले आहेत. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतर सुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्माचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयश ठरले आहेत. आणि आता ते मुघलशाही पद्धतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या या गोष्टीचा जाहीर निशेष करतो. मी त्यांना विरोध करतो. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करत अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावरती दबाव आणण्यासाठी माझ्या मोठ्या भावाला बेकायदेशीररित्या सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर चार जिल्ह्यातून हदपार करण्याची नोटीस दिली. त्याच चालाकीचा वापर करत जर खरोखर मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्याचा केला असता. तर नक्कीच काही तरी मार्ग निघाला असतात. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये कामगारांचा संप झाला. आणि तो संप चिघळवला गेला. आणि तसाच अनिर्णयत ठेवून मिल मालकांची हात मिळवणी करत, मिलीभगत करत, त्या सगळ्या करोडोच्या जागा लाटल्या गेल्या त्या जागांमध्ये मोठा घोटाळा केला गेला. टक्केवारी घेतली गेली त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून विविध ठिकाणी ज्या मोक्याचा जागा आहेत. त्या जागांची विल्हेवाट डाव माननीय मंत्री आणि परब आणि सरकारचा दिसतोय.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अजित पवारांचे विचार चिंधी”, निलेश राणेंचे पुन्हा टीकास्त्र

News Desk

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका !

News Desk

जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी दर महिन्याला होणार लोकांसमवेत बैठक

News Desk