HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी संप मिटवण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे, राज्य सरकारची भूमिका; पडळकरांचा गंभीर आरोप

मुंबई | “एसटी संप मिटवण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे, त्यात वाढ झाली पाहिजे असा सुनियोजित कट सरकार रचत आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मुद्द्यांवर एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. आता बहुतांशी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर काही ठिकाणी कर्मचारी हे विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम असून त्यांचे आंदोलन सुरू आहे. येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारकडे त्रिसदस्य समिती विलीनीकरणाचा अहवाल सादर करणार आहे. तर मुंबई उच्च न्यायालयात २२ फेब्रुवारीला विलीनीकरणावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पडळकरांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहे. 

 गेल्या तीन महिन्यांहून जास्त कालावधीपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने मध्यस्थी करून एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि वेतन निश्चिती यासंदर्भात घोषणा करून संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काही प्रमाणात पूर्ण करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यावर कर्मचाऱ्यांचं समाधान झालेलं नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असताना आता  पडळकरांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

पडळकरांनी राज्य सरकारवर संप चिघळवण्यात जास्त रस असल्याचा आरोप केला आहे. “एसटी संप मिटवण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे, त्यात वाढ झाली पाहिजे असा सुनियोजित कट सरकार रचत आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा असं आवाहन करायचं. आणि तो कर्मचारी जेव्हा कामावर रुजू होतो, तेव्हा त्याच्या हातात चार्जशीट द्यायचं. ५० लाखांचं, एक कोटीचं नुकसान झालंय असं सांगून त्यांना नोटीस द्यायची असं सरकार करत आहे”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

समितीनं अहवाल दिल्यानंतरही…”

“सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या बाबत समितीनं सरकारकडे अहवाल दिला. आता सरकार पुन्हा आठवड्याभराची मुदत मागतेय. म्हणजे सरकारला हा संप कसा चिघळतोय आणि आपल्याला कशी नवी भरती काढता येईल, म्हणजे त्यात आपल्याला टक्केवारी घेता येईल, मोठा घोटाळा करता येईल, एसटीच्या भरतीत मोठा घोटाळा करता येईल हा प्लॅन सरकारचा दिसतोय”, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले असून राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचं विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीपासून मागे हटण्यास एसटी कर्मचारी तयार नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आज सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

News Desk

पालघर प्रकरण : लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल!

News Desk

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna