HW News Marathi
महाराष्ट्र

INS विक्रांतमध्ये एका दमडीचाही घोटाळा केलेला नाही! – किरीट सोमय्या

मुंबई | “आयएनएस विक्रांतमध्ये एका दमडीचाही घोटाळा केला नाही,” असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. सोमय्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला आहे. यानंतर सोमय्या हे मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सोमय्यांना जर अटक झाल्यास त्यांना ५० हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. सत्र न्यायालयाने काल (१२ एप्रिल) किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर सोमय्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांनी न्यायालयाकडून दिलासा मिळाला. 

सोमय्या म्हणाले, “मुंबई उच्च न्यायालयाचा आणि न्यायामुर्तीं यांचे मी आभार मानतो. न्यायालयाने जे प्रश्न चिन्ह उपस्थित केले तेच मी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारतोय की, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना माफियागिरी करायला लावायची. खोट्या एफआयआर फाईल कराच्या, अटक करून जेलमध्ये टाकायची भाषा वापरायची. हे महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवत आहेत. विक्रांतमध्ये आयएनएस विक्रांतमध्ये एका दमडीचाही घोटाळा आम्ही केलेला नाही. ५८ कोटीची भाषा संजय राऊतांनी वापरली होती. आठ आरोप आणि आठही आरोपमध्ये एकही कागद नाही, पुरावा नाही. फक्त स्टेंटबाजी करायची २-५ दिवस मीडियाचे लक्षवेधून घ्याचे. न्यायालयावर माझा विश्वास आहे. न्याया मिळण्याची सुरुवा झाली आहे.” 

काही वेळा होमवर्क करण्यासाठी नॉट रिचेबल व्हावे लागते

“काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तुमच्या विरोधात भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले, त्यावर सोमय्या म्हटले, ते न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत. देव त्यांना सबुद्धी देओ. हे जे नाटक गेले ४-५ दिवस चालू होते. ते उद्धव ठाकरेंनी ठरवले होते. राऊत हे प्रवक्ता आहे. मास्टरमाईड उद्धव ठाकरे आहेत. कारण ठाकरेंच्या पोरांचे त्यांच्या पत्नीचे घोटाळे ज्यावेळी बाहेर येईला लागले. कसही करून किरीट सोमय्याला जेलमध्ये टाका आणि त्यांचे तोंड बंद करा. उद्धव ठाकरेसाहेब डर्टी डझनचे घोटाळे मी ते बाहेर काढणार आणि शिक्षा भेटेपर्यंत किरीट सोमय्या असाच सक्रीय  राहणार. ऐवढे दिवस तुम्ही नॉट रिचेबल होतात, तुम्ही कुठे होतात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, काही वेळा होमवर्क करण्यासाठी नॉट रिचेबल व्हावे लागते,” असे सोमय्या म्हणाले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावीत राहणाऱ्या दहशतवाद्याची माहिती नव्हती हे ATS चं अपयश!

News Desk

#CoronaVirus : मुंबईची लोकल-बस सेवा बंद करणार नाही,नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा !

swarit

ज्या लोकांनी कंगनाची बाजू घेतली त्यांचे तोंड काळे करुन कंगना गेली – प्रताप सरनाईक 

News Desk