HW News Marathi
महाराष्ट्र

BiharElection | उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, आता कुठे गेला उद्धव ठाकरे आणि राऊतांचा चमत्कार? – किरीट सोमय्या

मुंबई | बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने बाजी मारली. तर बाकी पक्षांना हार मानावी लागली. यात शिवसेनेलाही हार पत्करावी लागली आहे. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ ओढवलेल्या शिवसेनेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी डिवचले आहे. बिहारमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. आपापल्या मतदारसंघात त्यांना एक टक्काही मते पडली नाहीत. मग आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चमत्कार कुठे गेला, असा बोचरा सवाल विचारत सोमय्या यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने बिहारमध्ये २३ जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हिरीरीने प्रचारही केला होता. मात्र, एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती. त्यामुळे आता शिवसेनेकडून भाजपला काय उतत्र मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भ्रष्टाचार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुण्याहून मुंबईपर्यंत पायी लाँग मार्च

News Desk

संप सुरू असला तरी बरेच कर्मचारी कामावर येण्यास तयार | एसटी महामंडळ

News Desk

राज्याचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो…!, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल

Aprna