HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री हवा, राणेंची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका

नागपूर | राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री हवा असे मला वाटते, असे म्हणत भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूरच्या दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी आज (२० डिसेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यावर तोफ डागली. राणे म्हणाले की, “मुख्यमंत्री जुना की नवा यात जाणार नाही. पण, राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री हवा असे मला वाटते, राज्याच्या विकासचे प्रश्न ज्याला माहिती आहेत आणि ते सोडवण्याची धमक असणारा मुख्यमंत्री राज्याला हवा. तर राज्याचा विकास होईल नाही तर हा राज्य अधोगतीला जाईल, आणि याला जबाबादार सत्ताधारी असतील,” असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंच्या निशाणा साधला.

राणे म्हणाले की, “आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, आणि अशी महाविकासआघाडी झाली नसती, अशी टीका राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी महाविकासआघाडीही फक्त मुख्यमंत्री पदासाठी केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी, ना राज्य, ना जनता आणि त्यांनी स्वता:च्या पक्षाची विचारसरणी देखील सांभाळली नाही. गेली ५२ वर्ष शिवसेना ज्या विचारसरणीवर चालली होती. त्याला उद्धव ठाकरेंनी मूठमाती दिली.” “काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सर्व धर्मसमभाव आहे. मात्र, शिवसेना हिदुत्त्ववादी आहे, अशी भिन्न विचारसरणीची माणसे ही फक्त सत्तेसाठी आणि वैयक्तिक स्वार्था एकत्र आली आहे,” असा टोला राणेंनी लगावला.

मुख्यमंत्र्यांची भाषा खालच्या दर्जाची | राणे

“राज्यपालांना जो मान सन्मान दिला पाहिजे ती शैली येथे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी भाषा खालच्या दर्जाची अगदी हलक्या थरातील भाषा वापरली राज्यपालांच्या भाषणावर कोणताही मुद्दा नव्हता,” असेही राणे म्हणाले. महाविकासआघाडीचे पहिले हिवाळी अधिवेशन असून या अधिवेशनात पाच दिवस सुरू आहे. यात राज्यतातील जनतेचा एकही प्रश्न नाही, आणि कोणताही हेतू नाही, या अधिवेशनात राज्याच्या प्रथा आणि परंपरा गुडाल्या जात आहेत.

मंत्रिमंडलाचा विस्तार झाला नाही | राणे

मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन देखील राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला नाही” असा सवाल देखील राणेंनी मुख्यमंत्र्यांना विचारले. “राज्यपालांना जो मान सन्मान दिला पाहिजे ती शैली येथे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी भाषा खालच्या दर्जाची अगदी हलक्या थरातील भाषा वापरली राज्यपालांच्या भाषणावर कोणताही मुद्दा नव्हता,” असेही राणे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत द्या, काँग्रेस शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

News Desk

मुंबई महापालिकेने केलेली कारवाई महापालिकेच्या नियमानुसारच केली – किशोरी पेडणेकर

News Desk

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकार दुर्लक्ष करत आहे का?

News Desk