HW News Marathi
महाराष्ट्र

निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासमध्ये उद्धव ठाकरेंची नोंद होईल; निलेश राणेंची जहरी टीका

मुंबई | निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासमध्ये उद्धव ठाकरेंची नोंद होईल, अशी जहरी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केले आहे. भाजपला चारीही नगरपंचायतीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काय उपयोग नाही, चाळीस दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही, असे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कामाचे नाहीत. पण त्यांच्या आमदार काय कामाचे म्हणून मुख्यमंत्र्याच्या वार्ता करू नका, जर निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद इतिहासामध्ये तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होईल, असे ते यावेळी म्हणाले.

विरोधकांनी किती भांडणे लावायचा प्रयत्न केला तरी भांडणे लावायचा प्रयत्न केला तरी त्यांची उंची तेवढी त्यांची अक्कल तेवढीत राहते. असल्याने ते फक्त भानगडी लावायचा प्रयत्न गेली दोन दिवसांपासून करत आहे. परंतु निवडणूक ही शांतते मध्ये पार पडावी यासाठी शांत राहून जनतेमध्ये राहून काम करत आहेत, असे राणेंनी आज (२१ डिसेंबर) कुडाळ येथे केली. आपल्याला डेवलपमेंट हवी हे भांडण नको, पण शिवसेना असेल विरोधक असतील त्यांना भानगड विकास नको आज फरक आहे, त्यांना ते बोलावे लागते या चार पैकी एकही त्यांची नाहीच आहे म्हणून त्यांना तसे बोलावे लागते, अशा बोगस आमदाराने विजयाची वार्ता करू नये येणाऱ्या निकालच्या दिवशी चारी चारी नगरपंचायतीने भाजपचा विजय होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

“एवढ्या दिवस प्रचारामध्ये काय भाषण केले? भाषणांमध्ये त्यांनी किती निधी आणला हे सांगता आल नाही. शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगून उपयोग नाही. ते त्यांच्या पॅम्प्लेटमध्ये पाहिजे होते. रस्त्यासाठी एवढे अमुक अमुक निधी, विकास कामांसाठी किती निधी आणला सांगू शकले नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काही उपयोग नाही. ४० दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कामाचे नाहीत. त्यांचे आमदारच काय कामाचे आहेत? त्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्र्याच्या वार्ता करू नका. निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद इतिहासात झाली तर ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होईल,” अशी टीका निलेश राणे यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ! – देवेंद्र फडणवीस

Aprna

पूरग्रस्तांसाठी राज्याचा केंद्राकडे ६००० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव

News Desk

महिला व बालकांवरील अत्याचाराविरोधात राज्य सरकारकडून ‘शक्ती’ विधेयकाला मान्यता !

News Desk