HW News Marathi
महाराष्ट्र

आघाडीच्या नावात ज्याचं ‘शिव’हरवलं त्यांनी एनडीएमध्ये राम उरलाय का याची चर्चा करणं हास्यास्पद!

कोल्हापूर | एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर पडल्यानंतर आघाडी सरकारमधील शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली होती. ‘आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने आता या आघाडीचे म्हणजेच एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे काय?एनडीएमध्ये खरंच राम उरला आहे का? ‘सेनेने भाजपवर हल्लाबोल केला होता. आता कोल्हापूरमधील भाजपच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.“ज्यांच्या आघाडीच्या नावामधूनच ‘शिव’ कधी हरवलं हे कळलं नाही, त्यांनी एनडीएमध्ये राम उरलाय का वगैरे चर्चा करणे म्हणजे जरा हास्यास्पद आहे”, असे ट्विट करत शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखावर टीका केली आहे.

 

काय लिहिले आहे अग्रलेखात?

आघाडीत अनेक चढउतार आले. सत्ता आली, सत्ता गेलीत. अनेक घटक पक्ष सोयीनुसार सोडून गेले. पण एनडीएचे दोन खांब भाजपबरोबर राहिले ते म्हणजे शिवसेना आणि अकाली दल. आज या दोन्ही पक्षांनी एनडीएला राम राम ठोकल्याने एनडीएत खरच राम उरला का, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे. जेथे अल्पमत होते, तेथेही या ना त्या मार्गाने सत्ता मिळविली. केंद्रीय सत्तेचे बाहुबल हाती असेल की, काहीच अशक्य नसते, पण सत्तेचे गड जिंकले तरी एनडीएतील दोन सिंह मात्र गमावले आहेत, हे वास्तव कसे नाकारणार? असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध | मुख्यमंत्री

swarit

अन् वधूची घोड्यावरून मिरवणूक निघाली

News Desk

#MaharashtraElections2019 : महायुती आणि महाआघाडीला बंडखोरांचे मोठे आव्हान

News Desk