HW News Marathi
Covid-19

कुठल्या प्रश्नावर आंदोलनं करायची याचं भान भाजपच्या नेत्यांना राहिलेलं नाही !

मुंबई | “महाविकास आघाडी सरकारला जनभावना समजते. त्यामुळे लवकरच व योग्यवेळी राज्यातील मंदिरे व सर्व धर्मस्थळेउघडण्याचा निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. “भाजपा मंदिराच्याबाबतीत राजकारण करत आहे. आंदोलने जरुर करा परंतु कुठल्या प्रश्नावर आंदोलने केली पाहिजे याचं भान भाजपाच्या नेत्यांना राहिलेले नाही”, असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे.

मंदिर प्रवेश किंवा देवदर्शन हा एक भावनिक मुद्दा आहे. यावर राजकारण करण्याऐवजी भाजपाच्या नेत्यांनी लोकांची उपजीविका कशी सुधारेल, लोकांना, तरुणांना रोजगार कसा मिळेल यावर काम करावे आणि केंद्र सरकारकडे राज्याचा असलेला जीएसटीचा परतावा परत कसा मिळेल यासाठीही आंदोलन करण्याचे धाडस दाखवावे”, असे आव्हान महेश तपासे यांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहे.

“जनतेच्या जनभावनेचा आदर करणारे महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे मंदीरेच नव्हे तर सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील यात शंका नाही”, असेही महेश तपासे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फेल?”, मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

News Desk

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून ‘शिक्षण मंत्रालय’ असे नवे नामकरण

News Desk

#AyodhyaRamMandir | राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे, रोहित पवारांची भावनिक साद

News Desk