HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबद्दलचे ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे, रामदास आठवलेंची मागणी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, असे आक्षेपार्ह वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली आणि पडळकरांनी त्यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. सर्व महाराष्ट्राला ते आदरणीय आहेत. त्यामुळे पडळकरांनी ते वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ट्वीट करत केली आहे.

रामदास आठवले ट्वीटमध्ये म्हटले, “शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. सर्व महाराष्ट्राला ते आदरणीय आहेत. त्यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य अयोग्य अवमानकारक आहे. एकमेकांचा आदर करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे.त्यामुळे पडळकरांनी ते वक्तव्य मागे घ्यावे.”

गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले

‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,’ अशी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर कार्यकर्ते आक्रमक!

News Desk

“राज्य आम्हाला देऊन टाका आम्ही वेटींगवरच आहोत”, नारायण राणेंचं सूचक विधान

News Desk

…म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीत इन्कमिंगला सुरूवात – नवाब मलिक

News Desk