HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत तसंच बहुजन युवकांचं पालकत्व स्वीकारा !

मुंबई । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर राजकीय टोलेबाजी देखील केली आहे. “मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे तातडीने आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा”, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. “मराठा आरक्षण रद्द झाले ही वेदनादायी गोष्ट आहे आणि त्यासाठी महाविकासआघाडीच जबाबदार आहे. मात्र, आता उर्वरित समाजाचं काय? मराठा समाजाबरोबरच इतर भटक्या, मागासवर्गीय, अनुसुचित जाती व जमातींमधील युवकांच्याही आयुष्याशी खेळ सुरू आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या ७६ विद्यार्थ्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पुढेही आरक्षण न टिकल्यास या जागांचं काय करायचं?” , असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

“इतर सर्व मागासवर्गीय, NT, SC, ST प्रवर्गातील 365 युवकांना अजून नियुक्ती नाही. या युवकांच्या नियुक्त्या या सरकारने का रोखल्यात ? संबंधित युवकांना या नियुक्या मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार नाही का ? कुणाला घाबरून सरकार ही टोलवाटोलवी करत आहे ? याचं उत्तर आपणाला द्यावं लागेल. महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे आणि दिरंगाईमुळे मराठा समाजासोबतच इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फटका बसतोय व समाजा-समाजात तेढ वाढत आहे. आपण त्वरित निर्णय न घेतल्यास या परिस्थितीचा उद्रेक होईल. असे घडल्यास हे महाविकासआघाडी सरकारचेच पाप असेल”, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

गोपीचंद पडळकर याचसोबत पुढे मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना म्हणाले की, “सदर नियुक्त्यांचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तात्काळ या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यामागचे चित्रा वाघ यांचे ‘हे’ कारण

News Desk

राणा दाम्पत्याला अटक; आजची रात्र जेलमध्येच

Aprna

विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २७ फेब्रुवारी रोजी मतदान

Aprna