HW News Marathi
महाराष्ट्र

‘गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र!’

मुंबई | ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्यापही संपलेला नाही. आरक्षणाच्या मुद्यावरून काल(३ सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक पार पडली होती. यावरून आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यात पडळकरांनी ओबीसी आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमिती गेल्या दीडवर्षापासून हरवली आहे आणि तिचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी, अशी खोचक टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसींना डावलण्यात येत असल्याचा आरोप पडळकरांनी पत्रात केला आहे.

काय म्हणाले पडळकर?

“महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसी ,भटके विमुक्त यांच्या हक्क-अधिकारांना कायम डावलण्यात आलं आहे, पदोपदी ओबीसींचा अपमान करण्यात येत आहे. हे शासकीय पदांवरील पदोन्नतीमध्ये, MPSC च्या उत्तीर्ण मागासवर्गातील उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांमध्ये, ओबीसींच्या राजकीय आरक्षणबाबत न्यायालयात बाजू मांडतानाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी मुद्दामहून ‘सेन्सेस डेटा आणि इंपेरिकल डेटा’ यात निर्माण केलेल्या संभ्रमामध्ये, अशा अनेक उदाहरणांवरून स्वच्छपणे दिसून आलं आहे”, असं पडळकरांनी म्हटलं आहे.

समितीमध्ये कुणी साधी सुधी मंडळी नव्हती

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत त्यांचा आक्रोश मांडला आहे. “ओबीसींच्या आरक्षणा संबंधी, शासकीय लाभ व सवलती संदर्भात आणि ओबीसी संघटनांच्या विविध मागण्यांचा समग्र अभ्यास करून मंत्रीमंडळाला शिफारस करण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली. या उपसमितीला आता वर्ष होत आलं आहे. बरं या समितीमध्ये कुणी साधी सुधी मंडळी नव्हती. ओबीसींसाठी मोठ्या वल्गना करणारे,ओबीसींवरील प्रेम दाखवत आणाभाका घेणारे आणि प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेले महाविकास आघाडी सरकारमधील ‘दिग्गज’ ओबीसी नेत्यांचा फौज फाटा या उपसमितीमध्ये होता. दिग्गजांची मांदीयाळी या समितीत असताना यांनी वर्षभरात ओबीसी प्रश्नांवर नेमका कोणता अभ्यास करून अहवाल सादर केलाय, हे कळायला मार्ग नाही.

म्हणूनच सामान्य ओबीसी जनतेला ही फक्त ‘दिग्गज’ ओबीसी नेत्यांची ‘मांदीयाळी’ नसून ही ‘निष्क्रीय दिग्गजांची उपसमिती’ आहे, असे वाटायला लागले आहे. ही उपसमिती गेल्या वर्षभरापासून स्थापन झाली आणि स्थापन होताच ‘अदृश्यही’ झाली”, असं पडळकरांनी म्हटलं आहे.

उपसमिती नेमकी कुठे हरवली आहे?

“अदृश्य व हरवलेली उपसमिती नेमकी कुठे हरवली आहे? हीला शोधण्यासाठी आपण नव्याने एखाद्या ‘टास्क फोर्स’ची स्थापना कराल का मुख्यमंत्री महोदय? तसे जर शक्य नसेल तर राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ओबीसी जनतेकडून ‘ही उपसमिती हरवली आहे’, अशी आम्ही तक्रार दाखल करू. जेणेकरून नेहमीच ‘कार्यतत्पर’ असलेली पोलिस यंत्रणा या समितीचा शोध घेईल”, असं गोपीचंद पडळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत सरकार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करणार, शरद पवार यांनी या निर्णयाचे केले स्वागत…

News Desk

एवढेही येऊ नका की आम्हालाच बाहेर पडावे लागेल !

News Desk

लोकांचा जीव महत्त्वाचा, जमेल ती मदत करा, राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन

News Desk