HW News Marathi
महाराष्ट्र

“राज ठाकरेंना अयोध्येत रोखण्यासाठी 5 लाख लोक आणणार,” ब्रिजभूषण सिंह यांची मोठी घोषणा

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर जाण्याआधीच उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नेतृत्वात आज (१० मे) नंदिनीनगर येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत राज ठाकरेंनी अयोध्येत पाऊल ठेवण्याआधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंनी यूपीमध्ये प्रवेश करून नये. राज ठाकरेंना अयोध्ये येण्यापासून रोखण्यासाठी ५ लाख लोक जमवणा, अशी भूमिका ब्रिजभूषण सिंहांनी त्यांनी घेतली आहे. 

ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “राज ठाकरेंनी अयोध्येत पाऊल ठेवण्याआधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंनी यूपीमध्ये प्रवेश करून नये. सांधू-संतांचा राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत निर्णय घेतला आहे. राज ठाकरे माफी न मागता यूपीत आल्यास ‘छटी का दुध याद दिलाएंगे’. राज ठाकरेंना विमानतळावर उतरू देणार नाही. राज ठाकरे जर ट्रेनमधून आले तरी त्यांना उतरु देणार नाही. राज ठाकरेंना रोखण्यासाठी ५ लाख लोक जमणार असून जननायक काय असतो हे राज ठाकरेंना कळेल. राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत कोणतेही राजकारण नाही.”  

सर्वंच गोष्टींना उत्तर देणेय योग्य नसते – बाळा नांदगावर

 अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज मनसे प्रवक्त्यांची बैठक पार पडली. उत्तर प्रशात राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून विरोध प्रदर्शन केले जात आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावर यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. नांदगावर म्हणाले, “सर्वंच गोष्टींना उत्तर देणेय योग्य नसते. आज संघटनात्मक दृष्टीने महत्वाची बैठक पार पडली असून या बैठकीत पक्षाचे सर्व प्रवक्ते आणि नेत्यांना बोलवण्यात आले होते. राज ठाकरेंच्या राज्यात तीन सभा झाल्या आहेत. या सभेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. परंतु, सध्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात चर्चा झाली असून या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.”    

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबद्दलचे ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे, रामदास आठवलेंची मागणी

News Desk

‘बारावीच्या निकालाआधी वर्षा गायकवाड म्हणाल्या’….!

News Desk

“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”, दरेकरांचं टीकास्त्र

News Desk