HW News Marathi
महाराष्ट्र

मनोरा पुनर्बांधणीत भ्रष्टाचार केल्याचा खोटा आरोप करणाऱ्या भाजपने बिनशर्त माफी मागावी !

मुंबई । “मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीसाठी प्रकल्पाची किंमत मोदी सरकारच्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच NBCC या कंपनीने ठरविल्याने भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर प्रकल्पाची किंमत वाढवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप खोटा ठरला आहे. म्हणून ९०० कोटींचा आकडा कसा आला ही माहिती न घेताच भ्रष्टाचाराची बोंब ठोकणाऱ्या भाजपा आमदार अतुल भातखळकर व भाजपाने आता बिनशर्त माफी मागावी”, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.मनोरा प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या अतुल भातखळकर यांना सचिन सावंत यांनी पुराव्यानिशी उत्तर दिले आहे.

“फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली काय?”

सचिन सावंत पुढे म्हणाले की, “सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर बेफाम आरोप करुन बदनाम करणारा भारतीय जनता पक्ष पुन्हा उघडा पडला आहे. मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला होता आणि नरेंद्र मोदी सरकारच्या NBCC कंपनीला त्याचे काम फडणवीस सरकारनेच दिले होते. भातखळकर यांनी राज्य सरकारने प्रकल्पाची किंमत वाढवली असा आरोप करून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. वस्तुस्थिती ही आहे की मोदी सरकारच्या NBCC या कंपनीनेच प्रथम २८ फेब्रुवारी २०२० रोजी विधिमंडळाला सादर केलेल्या इ टेंडर नोटीस मसुद्यामध्ये प्रकल्पाची किंमत ८१० कोटी रुपये सांगितली होती. ही कंपनी एवढ्या वरच थांबली नाही तर नंतर ८ डिसेंबर २०२० रोजी याच कंपनीने प्रकल्पाची किंमत सविस्तर अंदाजपत्रकात ८७५.६२ कोटी रुपये इतकी वाढवली. प्रकल्पाची किंमत ही मोदी सरकारच्या राष्ट्रीय कंपनीनेच ठरविल्याने नरेंद्र मोदी सरकारच्या NBCC ने यात भ्रष्टाचार केला का? फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? या प्रश्नांची उत्तरे भातखळकर व भाजपाने द्यावीत”, असेही सचिन सावंत म्हणाले.

भाजपला खोडसाळ आरोप करुन विरोधकांना बदनाम करण्याचा रोग !

भाजपवर टीका करताना पुढे सचिन सावंत म्हणाले कि, “भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माहिती न घेताच बेछूट आणि खोडसाळ आरोप करुन विरोधकांना बदनाम करण्याचा रोग जडलाय. सातत्याने भाजपाने हेच केले असून मनोरा प्रकल्पात केलेल्या आरोपांतही ते तोंडघशी पडले आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“परळीची जनता फार हुशार! कोणाला किती उडू द्यायचे आणि कोणाची पतंग कधी कापायची हे चांगलचं माहीत” – पंकजा मुंडे

News Desk

वारसा, संस्कार व ज्ञानातून देशाला सर्वोत्तम सेवा देणार! – सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत

Aprna

राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागणार?

News Desk