HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आता भाजप एकट्याने लढेल, पुन्हा फसवणूक नकोय! – चंद्रकांत पाटील

परभणी जिल्ह्यात भाजप स्वबळावर निवडणुका लढवेल आणि विजयाची परंपरा निर्माण करेल. आता भाजप राज्यात सर्वच निवडणुका एकट्याने लढवेल आणि कोणासोबत निवडणूक लढवून फसवणूक करून घेणार नाही, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (१२ ऑक्टोबर) केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर यांनी आपल्या समर्थक नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी, मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते.

“परभणी जिल्ह्यात भाजपचं संघटनात्मक कार्य चांगलं असलं तरी निवडणुकीत युतीमुळे शिवसेनेला संधी मिळाली आणि जिल्ह्यातील निवडणुकीच्या राजकारणात भाजप कमकुवत राहिली.मात्र, आता परभणीमध्ये भाजप स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहे. पक्ष निवडणुकीच्या राजकारणातही प्रभावी ठरेल आणि विजयाची परंपरा निर्माण करेल. आता महाराष्ट्रात भाजप एकट्याने निवडणुका लढवेल. एखाद्या पक्षासोबत निवडणूक लढवून फसवणूक करून घ्यायची नाही”, असा बोचरा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

केवळ भाजपलाच राजकीय भवितव्य!

“केवळ भाजपलाच राजकीय भवितव्य आहे. बाकी एकेका नेत्यांच्या मालकीच्या पक्षांमध्ये भविष्यात काय होणार? असा प्रश्न आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्याचं काम चालूच राहणार आहे”, असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचसोबत, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या परभणी जिल्ह्यातील नेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी आश्वस्त केलं आहे की, पक्षामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रविण दरेकर, गिरीश महाजन माणगावमध्ये अडकले, बचाव दलासोबत पुढे जाण्याचा प्रयत्नात

News Desk

‘राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी, म्हणाले….’

News Desk

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या !

swarit