HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यसभेसाठी ‘मविआ’ने दिलेली ‘ही’ ऑफर भाजपने धुडकावली; काय निर्णय घेणार सर्वांचे लक्ष

मुंबई | राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकासआघाडीचे शिष्ट मंडळ आज सकाळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी ६ जागांसाठी निवडणूक होणार असून यात भाजपने ३ उमेदवारी दिले आहेत. यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोधी होण्यावर प्रश्न चिन्ह आहे. आणि राज्यसभेसाठी आज (३ जून) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटीची तारीख आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपला ऑफर दिली की, “भाजपने राज्यसभेची एक जागा मागे घेतली. तर महाविकासआघाडी विधान परिषदेत एक जागा अधिक देण्याचे त्यांनी म्हटले.” परंतु, महाविकासआघाडीची ऑफर  भाजपने धुडकावली आहे. 

महाविकासआघाडीच्या वतीने भाजपाला ही ऑफर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार हे नेते भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवसस्थानी भेटीसाठी गेले होते. त्यावेळी भाजपच्या वतीने फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीवेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडीने भाजपला कोणती ऑफर दिली याबद्दल माहिती दिली. छगन भुजबळ म्हणाले, “आम्ही महाविकासआघाडीच्या वतीने भाजपला वनंती केली. राज्यसभेची भाजपने वाढवलेली एक जागा ती तुम्ही मागे घ्यावी, अशी विनंती केली. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल. पुढी विधान परिषदेला एक जागा आम्ही तुम्हाला वाढवून देऊ. यामुळे विधान परिषदेची निवडणूक देखील बिनविरोध होण्यास मदत होईल.” 

भाजप महविकासआघाडीला दिली ‘ही’ नवीन ऑफर

यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही त्यांना आग्रहाने असे म्हटले की, आम्ही विधान परिषदेला पाचवी जागा लढवणार नाही. तुम्ही राज्यसभेचा तिसरा उमेदवार मागे घ्या. आम्ही महाविकासआघाडीला दिलेल्या ऑफरवर ते म्हणाले की, आम्ही आपआपासत विचार करून ठरवू, असे सांगू ते गेले आहेत. आम्ही आमच्यात आपआपासात विचार करतो. कारण आमच्याकडे कम्युनिकेशन आणि सहभाग व्यवस्था खूप आहे, असे टोला पाटलांनी भुजबळांना लगावला आहे. पुढे पाटील म्हणाले, “आम्ही तिसरी जागा लढणे आणि तिसरी जागा जिंकणे, याबद्दल आमला खूप आत्मविश्वास आहे. जर महाविकासआघाडीला भाजपने दिलेला प्रस्ताव जर मान्य झाला नाही तर भाजप कुठल्याही परिस्थिती तिसरी जागा लढणार, पत्रकारांच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, “त्यांनी जर हा प्रस्ताव मान्य केला नाही. आम्ही तीन राज्यसभा लढवितो. तुम्ही एक राज्यसभेचा उमेदवार मागे घ्या. आणि विधान परिषदेला आम्ही पाचवी जागा लढवणार हा प्रस्ताव आम्ही मान्य केला नाही. तर ही राज्यसभेची निवडणूक होणार आणि आम्ही ही निवडणूक जिंकणार. महाविकासआघाडीला जशी त्यांच्या पक्षाची काळजी आहे. म्हणजे तीन पक्षाचे मिळून एकत्र निर्माण झालेल्या आघाडीची मोर्चाची काळजी आहे. तसेच आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. आमची काही ध्येय धोरणे आहेत. आमचे प्रघात आणि पायंडे आहेत. त्यामध्ये पार्टीचा एबी लावलेला तिसरा उमेदवार मागे घेणे आमच्या लेव्हलला शक्य नाही. यासाठी आम्हाला सहकार्य आणि दिल्लीशी बोलावे लागेल. आम्ही ही सर्व गोष्टी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलेले आहे. आणि पक्षश्रेष्ठींनी म्हटले की, तुमची भूमिका बरोबर आहे. आणि तुम्ही तुमच्या भूमिकेसोबत रहा, असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये क्विंटल मदत करा’, नवनीत राणांची मागणी!

News Desk

MPSC संदर्भात राज्य सरकारने दुर्लक्ष करु नये ! फडणवीसांची टीका

Ruchita Chowdhary

लॉंग ड्राईव्हला मला ‘या’ व्यक्तीसोबत जायला आवडेल – रोहित पवार

News Desk