HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार मंत्रालयात येतात,उद्धव ठाकरे कधी येणार ?

मुंबई | राज्यात निर्माण झालेलं कोरोनाचं संकट आणि गेल्या दोन दिवसांपासून घोंगावणारं तोक्ते वादळाचं संकट या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात आले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागातून परिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्फ फ्रॉम मंत्रालय कधी करणार?, असा सवाल भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या आधी देखील भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर राहूनच काम करतात याची टीका केली होतीच.

काय आहे केशव उपाध्ये यांचं ट्विट?

“मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी… त्यातच करोनाचे संकट आणि मुख्यमंत्री घरात बसलेत.” असं केशव उपाध्येंनी ट्विट केलं आहे.

तसेच, “अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पाहणी तरी केली, करतात पण मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? असा देखील सवाल उपाध्येंनी केला आहे.

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो, तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना वर्क फ्रॉम होम करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतकं मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार?” असंही उपाध्येंनी म्हटलं आहे.

याचबरोबर “महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिळवला. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे.” असा टोला देखील केशव उपाध्येंनी लगावला आहे.

 

अजित पवार झाले सतर्क

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली. तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन

News Desk

मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय… चंद्रकांत पाटील यांचा रोहित पवारांवर निशाणा

News Desk

“निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली” – बाळासाहेब थोरात

News Desk