HW News Marathi
देश / विदेश

वीर सावरकरांवरील काँग्रेसच्या आक्षेपार्ह मजुकरावरून भाजपची आक्रमक भूमिका

नवी दिल्ली | मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस सेवादलाच्या राष्ट्रीय शिबीरात ‘वीर सावरकर कितने ‘वीर’?’ या पुस्तकाचे वितरित करण्यात आले आहे. या पुस्तकात विनायक दामोदर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यासंदर्भात आक्षेपहार्य मजकूर लिहिला आहे. या लिखाणावरून सध्या दिल्ली ते गल्लीपर्यंत राजकारण तापले आहे. या पुस्तकासंदर्भात माहिती मिळातच भाजप काँग्रेसवर टीका केली. सावरकरवरील आक्षेपार्ह भूमिक शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिक घेत ट्वीट करत म्हटले की, “सावरकर महान होते. महान राहतील…”

भादंवि कलम १२०, ५००, ५०३, ५०४, ५०५ आणि ५०६ अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल विचारत या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदीची मागणी केली आहे. शेलार ट्वीटमध्ये म्हणाले की, “मा.मुख्यमंत्री महोदय तुमच्या महाराष्ट्र धर्माच्या पालनात जर स्वा.सावरकर येत असतील?तर तातडीने सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला.मराठी बाणा दिसू द्या! देशभक्तीच्या प्रतिकांवर काँग्रेसकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध. आम्ही सारे सावरकर!.”

 

या प्रकरणावर भाजपचे नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला केला आहे. फडणवीस म्हणाले की, “आमचे आराध्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजुकर असलेल्या पुस्तकाचे काँग्रेस पक्षाने वितरित करून आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. ही त्या पक्षाची बौद्धीक आणि मानसिक दिवाळखोरी आहे. असे ते म्हणाले. “या अशा दिवाळखोर पक्षाशी अनैसर्गिक आघाडी केलेली शिवसेना तीव्र निषेध नोंदवून या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालणार, की केवळ सत्तेसाठी आपल्या आराध्यांचे असे अपमान वारंवार सहन करणार, याचे उत्तर आम्हाला हवे आहे,” असा सवाल त्यांनी यावेळी शिवसेनेला विचारला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळमधील महापुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू

swarit

आरएसएस आणणार कामसूत्र

News Desk

भारतीय सैन्याकडे निधीची कमतरता ?

News Desk