HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना ‘साले’ बोलणार्‍या शेतकरीविरोधी भाजपचं धोरण घराघरात पोचवा, जयंत पाटलांचा घणाघात!

जालना। ‘मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झाला आहे. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे, असा आरोप करतानाच याच मतदारसंघातील भाजप नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना ‘साले’ बोलले होते. त्यांचं हे विधान घराघरात पोचवा’, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. एक वेळ असा होता की आपल्या पक्षात कोणी थांबत नव्हतं. लोकं पक्ष सोडून जात होते. आज मात्र त्यांना पश्चाताप होतोय की राष्ट्रवादीत थांबायला हवं होतं. आपण पडत्या काळात पक्षासोबत होतात आजही आहात याबद्दल भोकरदनवासियांना धन्यवाद दिले.

जे पक्ष सोडून गेले आहेत आणि पुन्हा वापस येऊ इच्छितात

2024 ला आपल्या अंगावर गुलाल पाडायचा असेल तर पक्षाचा विस्तार करा. जे पक्ष सोडून गेले आहेत आणि पुन्हा वापस येऊ इच्छितात अशांना सोबत घ्या, त्यांचे कुणी पक्ष सोडत असतील तर त्यांना आपल्या पक्षात घ्या. निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस डोक्यात ठेवून काम करा. मला मान्य आहे इथला कार्यकर्ता लढवय्या आहे. मात्र, आपण किती काळ लढाईच करणार? त्यामुळे 2024 ला गुलाल राष्ट्रवादी काँग्रेसचाच असायला हवा, असंही पाटील यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची तालुका पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठीची भूमिका असली पाहिजे

राज्यात आणि दिल्लीत भाजपची सत्ता असल्याने डोक्यावरील सुर्य कधी मावळणार नाही अशा भ्रमात भाजप होती, परंतु तो सुर्य मावळला आहे. आपलं सरकार प्रभावीपणे काम करतंय हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. शिवाय विरोधकांनाही आपलं सरकार आहे हेही जाणवलं पाहिजे. भोकरदन मतदारसंघात चंद्रकांत दानवे म्हणतील ते झालं पाहिजे असं सर्व अधिकार्‍यांना राजेश टोपे तुम्ही सांगा, असा आदेशच जयंत पाटील यांनी दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांची तालुका पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठीची भूमिका असली पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची भूमिका आग्रही राहिली पाहिजे, असंही पाटील म्हणाले.

इथला प्रत्येक कार्यकर्ता हा संघर्ष करणारा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भोकरदन येथील संघटना ही प्रचंड लढवय्यी आहे, समोरच्या बाजूला मोठी ताकद असतानाही तोडीची झुंज राष्ट्रवादी इथे देत आहे. इथला प्रत्येक कार्यकर्ता हा संघर्ष करणारा आहे, अशी शाब्बासकी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्याचबरोबर माजी आमदार चंद्रकांत दानवे इथे प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करतात. रस्ते, वीज, पाणी या सर्व गोष्टींवर याबाबत मागणी करत असतात. आपला स्वतःचा आमदार नसल्याने इथे थोड्याबहुत प्रमाणात अडचण येते मात्र या भागाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचा संपूर्ण पाठिंबा आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हासनगरात पुन्हा पोलिसांवर हल्ला, संतापाचे वातावरण

swarit

द्वेष व हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप आमदाराच्या फेसबुकवर बंदी !

News Desk

MPSC परिक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला – पंकजा मुंडे

News Desk