HW News Marathi
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : बंडखोर उमेदवारीचे भाजपला मोठे आव्हान

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतर केलेल्या नेत्यांना निवडणुकीत उमेदवारी दिल्याने पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदारी अर्ज दाखल केला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्या युतीपैकी फक्त भाजपच्या २७ मतदारसंघात जवळपास ११४ जणांनी बंडखोरी केली आहे. यात यात कोल्हापूरच्या चंदगडमध्ये सर्वाधिक ९ बंडखोर आहेत. अशा बंडखोरांना आवर घालण्यासाठी भाजपमधून संबधित उमेदवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

निवडणुकीत बंडखोरी करून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना उद्या (७ ऑक्टोबर) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या बंडखोरांमुळे पाडापाडीचे राजकारण होणार असून याचा फटका महायुतील बसण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यामुळे किती जण निवडणुकीच्या रिंगणातून किती बंडखोर माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व दौरे रद्द करून ते सध्या मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. आणि प्रत्येक बंडखोराला हॉटलाईनवर संपर्क साधून आश्वासनांची दिली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणूनच शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे नेते म्हटले जाते”, अजित पवारांनी मोदींना सुनावले 

News Desk

“…तर दिल्लीच्या नाका- तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील”, शिवसेनेचा घणाघात

News Desk

कोरोनाचा काळ संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र दौरा, पंकजा मुंडेंचा एल्गार

News Desk