HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे काँग्रेसीकरण सुरु झाले आहे !

मुंबई | “भाजपचे काँग्रेसीकरण सुरु झाले आहे. आम्ही मोठे केलेले नेते भाजप पळवत आहे”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. “विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सत्ताधारी पक्ष आमचे नेते पळवून आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांचे काय ? ते कधी मोठे होणार ? भाजपने आधी आपल्या कार्यकर्त्यांना मोठे करावे”, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाली आहे. काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपमध्ये सुरु असलेल्या या जोरदार इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर बोलताना आता जयंत पाटील यांनी भाजपला हा टोला लगावला आहे. “भाजप आम्ही तयार केलेले नेते पळवत आहेत. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांचे काय ? त्यांचे कार्यकर्ते कधी मोठे होणार ? भाजपने आधी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना मोठे करावे”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. “महिला आघाडीचे कोणीही पक्ष सोडून गेले तरी त्याचा कोणताही परिणाम आमच्यावर झालेला नाही.आमचे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. विधानसभेसाठी आम्ही २८८ जागांसाठी उमेदवारांची चाचपणी करत आहोत. आघाडी झाल्यावर आम्ही एकत्र काम करु. आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीची तयारी सुरु आहे. राज्यातील पूरपरीस्थितीमुळे काही चर्चा रखडल्या होत्या. मात्र, आता पुन्हा आम्ही चर्चा करु करू”, असेही जयंत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करणार?, राऊतांच्या विधानावर शरद पवार म्हणतात..

News Desk

ग्रामपंचायतीत सासू – सूनेत चुरशीची लढत! 

News Desk

शाळकरी मुलांच्या पाण्यात बुडून मृत्यूच्या कारणावरून परत मुंडे बहीण-भावात जुंपली

Aprna