HW News Marathi
महाराष्ट्र

‘भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण’, संजय राऊतांची टीका!

मुंबई। केंद्राच्या मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. यावेळी ठाणे शहरात सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणी यात्रेचे आयोजन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात्रेमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याची नोंद या गुन्ह्यामध्ये घेण्यात आली. यावर शिवसेना खासदार खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राज्यांमध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांकडून काढण्यात येणारी ‘जन आशीर्वाद यात्रा’ ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे असे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांची विरोधकांवर टीका

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं. त्यांनी भाजपाला संयम बाळगण्यास सांगितले आहे. “जन आशीर्वाद यात्रा ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही शक्तीप्रदर्शन करताय हे एक प्रकारे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा इशारा दिला आहे. राज्याला अडचणीत आणण्यासाठी आपण हे मुद्दाम करताय. ठीक आहे पण किमान तुम्ही संयम पाळा,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्याची माहिती CBIकडे गेली तर सर्व बाहेर येईल – किरीट सोमय्या

News Desk

लोकमान्य टिळक आणि रायगडावरील शिवसमाधी

Aprna

दरवर्षी नियोजन सांभाळणारे मंत्री कराड नेमके कुठे राहिले?

News Desk